“Riveting . . . [कल्पतरू ]
कविता नैतिक जीवनाशी आणि जगणे जे कर्मप्राप्त आहे. त्याच्याशी नातं जोडणारी आहे. बऱ्याच कवितांचा जन्म दु:खाच्या वेदनेची जुळणारा आहे. पक्षांनी उंच भरारी घ्यावी सर्व आकाश पादाक्रांत करावे असे कवीस वाटते.
"कांगारूचे जीवन जगलो.
पोटी धरून धरुनी सर्व लाभो.
क्षितिजा पुढचे क्षेत्र नवे"
प्रत्येक पदास लागणारी बुद्धिमत्ता व शैक्षिणिक पात्रता त्याचांजवळ होती. त्या पदावर ठसा त्यांनी उमटविला. सर्व पदाचे मान, अपमान सहन करण्याचे काव्य शक्तीचे मन कार्यरत असल्याचे हे सुलक्षण आहे. मोठी जागा सांभाळतांना पत्नीची तर सोबत आहेच पण आई असती तर, सोन्याला अधिक झळाळी प्राप्त झाली असती असे कवीस वाटते. याची कवितेतून फुटलेली वाट मोठी मनोज्ञ आहे.
कवीच्या भोवताली जग जे कुजबुजते त्यालाच काव्य म्हणावे का? हा प्रश्न कवीला पडतो तेंव्हा 'ओसरी कुणी सारवत नाही' ही कविता निर्माण होते. जीवनाकडे पाहण्याचा निर्मळ दृष्टिकोन कवीने शाबूत ठेवला हे आधुनिक कवीचे मूळ लक्षण आहे. त्याची 'आलोय गड चढून' या कवितेतील ही ओळ अंतर्मुख करून गेली.
"जीवनातील खूप हसलोय
हसतच घेतलय रडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गड चढून"
ही काव्य पंक्ती अथक प्रवासाची जाणीव विकसित करणारी असली तरी गड चढून आल्याची बेहोशीही प्रगट करणारी आहे. ह्या कवितेत सुंदर कल्पना कवीने मांडली असून ‘कल्पतरू’ या काव्यसंग्रहाचे वाचकांकडून स्वागत होईल अशी आशा. कल्पतरू
Hardcover
Published by श्री. निशिकांत सिध्दराज देशपांडे
June 24, 2017
| 164 Pages
| 13.8 MB
| 978-93 -86740- 09-0