“Riveting . . . [राजकारण]
आपल्या केवळ उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या अल्पशा आयुष्यात असामान्य पराक्रम गाजविणारा, आपले राज्यविस्तार करणारा, कधीही पराभूत न झालेला असा हा संभाजी धैर्यशील, साहसी तर होताच शिवाय निर्व्यसनी व पितृभक्तही होता. वयाच्या केवळ सोळा-सतराव्या वर्षी संस्कृतमधून लिहणारा, 'नखशिखान्त', 'नायिकाभेद', 'बुधभूषण', सप्तशतक' यांसारखे ग्रंथ रचणारा, काव्य, शास्त्र, विनोद यांत रमणारा असा हा बुद्धिमान संभाजी 'न भूतो न भविष्यती' असाच होता यात शंकांच नाही. !!
संभाजीचा स्वभाव, त्याचे वागणे याचा मनोविश्लेषण करण्याचा माझा हा प्रयत्न, कानेटकरांनी केलेल्या त्यांच्या मनोविश्लेषणापेक्षा खूपच वेगळा आहे. अर्थात, याचे कारण- 'प्रत्येकाची दृष्टी वेगळी,प्रत्येकाचे आकलन वेगळे' !
माझे हे आकलनही सर्वांनाच पटावे असा माझा आग्रह नाही. पण, या पुस्तकाच्या वाचनानंतर ते पटेल अशी आशा मात्र नक्कीच आहे.
राजकारण