“Riveting . . . [कृष्ण सखा माझा ]
कृष्णचरित्र एवढे व्यापक आहे, की त्याचा अभ्यास करून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे एका छोट्या सागराचे सर्वे जल प्राशन करण्याचा प्रयन्त करण्यासारखेच आहे. परंतु त्या सर्व चरित्रातील कृष्णाच्या अंतःकरण्याची अवस्था जी एकीएकच होती, ते त्याचे स्वरूप जाणून घेणे मात्र शक्य आहे आणि तेच खरे आवश्यक व आनंदाचे आहे. कृष्णचा अवतार हा द्वापार युगाच्या शेवटी शेवटी झाला. त्यावेळी अधर्म पराकोटीचा माजला होता आणि आत्मधर्माला ग्लानी येऊन स्वधर्माचरणाचाही ऱ्हास झालेला होता. मनामधील विष्यवासनेचे मूळ अत्यंत खोलवर गेलेले होते आणि शब्दज्ञानाचा सुकाळ झालेला होता. एकिकडे दुष्प्रावूत्तीचे लोक सत्तांध व मदोन्मत्त झालेले होते, तर दुसरीकडे सत्प्रवृत्तीचे लोक मनाने दुर्बल होऊन, त्यांचे स्वत्व हरवून बसलेले होते. अशावेळी सज्जनांचे रक्षण करून निर्मूलन करण्यासाठीच कृष्णाचा अवतार झाला होता.
कृष्णाने त्याचे सख्यत्त्व खरे तर, त्याच्या गोकुळानंतरच्या चारित्र्यामध्येही सर्वाना दिले. अर्थात गोकुळामध्ये हि संधी विशेषत्वाने व जास्त प्रमाणात उपलब्ध झाली हे खरे आहे. तेव्हा या " कृष्ण सख्याचे" सर्व चरित्रच या सख्यत्वाच्या सूत्रातून पाहणे अत्यावश्यक आहे. कारण तेव्हाच कृष्णाच्या रामपूर्ण चरित्राचा उलगडा होऊन, त्याचा योग्य अन्वयार्थ लागू शकेल आणि तेव्हाच कृष्णचरित्र्याचा खरा व पूर्ण आनंद अनुभवता येईल. या दृष्टीने लिखाण घडता घडता एकीकडे पृष्ठांची संख्याही वादातच राहिली आणि दुसरीकडे नित्याच्या सहवासातील अनेक प्रेमी व भक्तजनांच्या ठिकाणी या ' कृष्ण सख्या' हि भेट घेण्याची आतुरताही वाढतच राहिली. त्यांना कृष्णाच्या सख्यत्वापासून जास्त काळ दूर ठेवणेही अशक्य होऊ लागले आणि अयोग्यही वाटू लागले.
असा हा 'कृष्णसखा' सर्वांचा सखा होऊन रहावा. त्याचे प्रेम व सख्यत्व सर्वानाच मिळावे आणि त्यांना ते लाभावेही. त्याच्याविषयी सर्वांच्याच ठिकाणी भक्तिभाव निर्माण व्हावा आणि त्या भक्तीचा आनंद सर्वानाच नित्य अनुभवाचा यावा.
कृष्ण सखा माझा